Featured Posts
सूर्यग्रहणात ज्या गरोदर महिलेने भाजी चिरली होती, त्या महिलेनी दिलाय सदृढ बाळाला जन्म..
रामदासजी, तेव्हा का नाही `आठवले'? -नरेंद्र विश्वनाथराव वाबळे
आरक्षण देता येत नसेल, तर सगळेच आरक्षण रद्द करा : उदयनराजे
प्रत्येकाला बुध्दी दिलेली आहे. मी अनेकदा सांगितलं आहे, आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा व मेरिटवर निवड करा, अशी रोखठोक भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी मांडली.शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी आज (ता. २६) साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुण्यात तीन ऑक्टोबरला होणाऱ्या विचारमंथन बैठकीस उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. यावेळी दोन्ही नेत्यांनी आरक्षण प्रश्नावर तासभर चर्चाही केली. यावेळी माजी सभापती सुनील काटकर, शरद काटकर, हरिष पाटणे उपस्थित होते.
उदयनराजे पुढे म्हणाले, मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर या समाजात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी येत्या तीन ऑक्टोबरला मराठा समाजातील प्रमुख लोकांची बैठक होत आहे. मुळात हा आरक्षणाचा प्रश्न निर्माणच व्हायला नको होता. मराठा समाजाची माफक मागणी होती, प्रत्येकाला ज्या पध्दतीने आरक्षण दिले, त्या पध्दतीनेच आम्हालाही मिळावे. संपूर्ण कष्ट करण्याची तयारी असताना ही या समाजावर अन्याय झाला आहे. प्रत्येकवेळी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला की, इतर लोकांकडून विरोधात मोर्चे काढले जातात, कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, आज बऱ्याशा मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यांच्या मुलांनी व तरूणांनी जायचे कुठे, शेवटी व्यक्ती कोणही असली तरी शिक्षणाबाबत बोलायचे झाले तर मराठा समाजातील मुला-मुलींना चांगले मार्कस् मिळाले तरी त्याला ॲडमिशन मिळात नाही. उलट कमी मार्कस् असलेल्यांना ॲडमिशन मिळते. कोणताही विद्यार्थी असू देत, प्रत्येकाला बुध्दी दिलेली आहे. मी अनेकदा सांगितलं आहे, आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा व मेरिटवर निवड करा. त्यांनी कष्ट घेतले नाही आणि मराठ समाजातील मुलाने कष्ट घेऊन चांगले मार्क मिळविले. पण, त्याला ॲडमिशन न मिळाल्याने नैराश्य येते.
काही लोक आत्महत्या करतात, काही नेस्तनाबूतही होतात. त्यामुळे मराठा समाजाच्या मुलाने आपली महत्वाकांक्षा कशी पूर्ण करायची, असा प्रश्न उपस्थित करून उदयनराजे म्हणाले, राज्य शासन, केंद्र शासन असून देत ही सर्व माणसेच आहेत. त्यांनी थोडेसे माणुसकीच्या दृष्टीने विचार करायला हवा. ते मराठा समाजात जन्माला आले असते, तर आज जे माझे मत आहे, तेच मत त्यांचेही असते. पुण्यातील या बैठकीत ठोस चर्चा होईल. तेथे माझ्यापेक्षा वडीलधारी मंडळी असणार आहेत. त्यांचा अनुभव लक्षात घेता नेतृत्व कोणी करायचे हे महत्वाचे नाही, सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे. शासन, राजकिय पक्ष व न्यायालय असेल यांनीही जबाबदारी घेऊन निर्णय घेतला पाहिजे. तसे झाले नाही तर उद्रेक होईल त्याला जबाबदार कोण, लोक हातश झाल्यावर काय करणार, असा प्रश्न उदयनराजेंनी उपस्थित केला. दुसऱ्याचे कमी करून आम्हाला द्या, असे मराठा समाजातील कोणीही म्हणत नाही. त्यांना दिले तसेच मराठा समाजाला देऊन टाका, अशी आमच्या सर्वांची मागणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जात पात पाहिली नाही. सर्वधर्म समभावातून स्वराज्याची स्थापना केली. सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांनी वाटचाल केली. त्यांना आपण दैवत म्हणून बघतो, त्यांचेच विचार घेऊन आज आपण या प्रश्नावर वाटचाल केली पाहिजे, अशी अपेक्षाही उदयनराजेंनी शेवटी व्यक्त केली.
मोदींच्या मदतीला धावून जाणारी भाजपची बी टीम राष्ट्रवादी काॅंग्रेस ? ए अंदर की बात हैं
मोदींच्या मदतीला धावून जाणारी भाजपची बी टीम राष्ट्रवादी काॅंग्रेस ? ए अंदर की बात हैं, #शरद_पवार_हमारे_साथ_हैं”
महाराष्ट्र
राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल सभागृहात कृषी विधेयकावर बोलले पण त्यांनी या विधेयकाला कुठेही विरोध केला नाही, फक्त त्यांनी सभात्याग केला. मी तुम्हाला इतकंच सांगू शकतो की एक घोषणा आहे ना… ‘ये अंदर की बात है’, त्याप्रमाणे ‘ये अंदर की बात हैं…शरद पवार हमारे साथ हैं, असं नितेश म्हणाले.
कृषी विधेयकावरून त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. शेती आणि शिवसेनेचा कसलाही संबंध नाही. कृषी विधेयकावर संजय राऊतांनी तळ्यात मळ्यात भाषण केलं. त्यांच्या पक्षाला नेमकं कुठं जायचंय, त्यांच्या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे त्यांना हेच माहिती नाही, अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
नितेश राणे म्हणाले, जेव्हा हे विधेयक सभागृहात मांडण्यात आलं तेव्हा महाविकास आघाडीतील दुसरे पक्ष मग राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, आपण जर त्यांच्या नेत्यांची भाषणं व्यवस्थित ऐकली तर असं लक्षात येईल की संजय राऊतांनी तळ्यात मळ्यात भाषण केलं. त्यांना माहितीच नाही की त्यांच्या पक्षाला नेमकं जायचंय कुठं, किंबहुना शेती कुठे करतात आणि कशी करतात हे त्यांच्या नेतृत्वाला माहिती नाही. शेतीवर ते कधीही भूमिका घेत नाहीत.
काँग्रेस कृषी विधेयकाला करत असलेल्या विरोधावर बोलताना नितेश म्हणाले, “काँग्रेस पक्ष आज पुढे येऊन आंदोलन करतोय पण स्वत: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचे 2013 ला विधान आहे की आम्ही जर सत्तेत आलो की बाजार समित्या रद्द करू.
तसंच 2019 च्या जाहीरनाम्यात देखील त्यांनी तेच आश्वासन दिलं होतं. ते जे करणार होते तेच आताच्या सरकारने पाऊल उचललं आहे मग त्यांचा आता विरोध कशासाठी? की फक्त विरोधाला विरोध करायचा म्हणून ते विरोध करतायत?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
संपूर्ण देशभरातला शेतकरी पंतप्रधान मोदींच्या पाठीशी खंबीरपणा उभा आहे. काही मोजकी राज्य सोडली तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना विश्वास की आम्हाला मोदींनी न्याय दिलाय. केंद्र सरकारने आमच्या भविष्याला आकार दिलाय, त्यामुळे विरोधकांच्या आंदोलनाला काही अर्थ नाही, असंही ते म्हणाले.
शरद पवारांचा कृषी विधेयकाला विरोध नाहीच- देवेंद्र फडणवीस
सत्य स्विकारा; गायीच्या पोटातील ३३ कोटी देव गायीचे रक्षण करू शकत नाही त्यासाठी माणसांना कायदे करावे लागतात आश्चर्य आहे राव.
गायीच्या पोटातील ३३ कोटी देव गायीचे रक्षण करू शकत नाही त्यासाठी माणसांना कायदे करावे लागतात आश्चर्य आहे राव...
निर्जीव खांबातून नरसिंह बाहेर येतो... आणी सजीव गाईतून कत्तलखान्यात नेली तरी 33 कोटी बाहेर येत नाहीत...मित्रांनो पुढच्या काळात आपल्याला बहुजन समाजासाठी खुप कष्ट घ्यायची गरज लागणार नाही कारण पुढची पिढी इतकी चिकित्सक आणि हुशार झाली आहे... याच श्रेय मी (तात्पुरता) महाभारत रामायण सिरीयल वाल्यांना देतो. सिरियल बघताना या मुलांना सहज पडणारे प्रश्न...
🔺पांडव कसे जन्माला आले ?
🔺रामाचा खरा बाप कोण ?
🔺आकाशात उडणारे बाण बरोबर समोरासमोर कसे येतात ?
🔺द्रोणाने एकलव्याचा अगंठा कोणत्या अधिकारा खाली घेतला ?
🔺राक्षसांना शिंगे होती तर त्यांच्या पुढच्या पिढी कुठे आस्तित्वात आहेत ? कारण परशुरामाने पृथ्वी 21 वेळा निक्षेत्रीय केली आहे तरी अजून क्षत्रिय जीवंत आहे मग राक्षशांचे वंसज कुठे आहे
🔺जर त्या लुप्त झाल्या आहेत तर इतिहासात डायनासोर प्रमाणे त्यांचा उल्लेख का नाही ?
🔺विमान वापरणारे पूर्वजांचे वशंज राइट बंधूच्या पेटंटवर ऑब्जेक्शन का घेत नाहीत?
🔺तेव्हा जर विमान होते तर घोङ्यांना का रथाचा त्रास ? विमान असताना.
🔺रणगाङ्यांचा शोध अवघङ होता का ?
🔺हनूमान जर पर्वत उचलून आणू शकत होता तर त्याच पर्वतावर बसवून सर्व सैन्य का नेलं
नाही ? सेतू बांधण्याची उठा ठेव वाचली असती
🔺दुर्योधन जर एका सुतपूत्राला राजा बनवत असेल तर तो समानतेचा पुजारी होता ! मग सगळे पांङवाना का मानतात ?
🔺जर हजारों वर्षापूर्वीच्या ''बौद्ध '' स्तुपांचे आवशेष सापङत असतील तर पांडवाचे महाल त्यांची मोठमोठी शहरं कूठ गेली ?
🔺जर भारतात हजारो वर्षापासून हिंदू धर्म होता तर "बौद्ध " लेण्यांची संख्या एवढी जास्त कशी ?
🔺आणि नेमके "बौद्ध " लेण्यांच्या बाहेर हिंदू देवांची मंदिर कशी ?
🔺हिंदू धर्मातील देवतांनी पृथ्वी आणि जिवांची निर्मिती केली तर भारत सोडून इतर देशात हिंदू देव वा हिंदू धर्म का नाही ?
🔺देवांना वर स्वर्गातून फक्त भारत देश, हिमालय, हिंदी महासागर, गंगा, यमुना नद्या च का दिसत होत्या
🔺त्यांना अमेरिका , फ्राँन्स , इंग्लंड , रशिया , चिन ,जपान , आफ्रिका असे कितीतरी देश आहेत. ते का दिसले नाही किंवा तिथे ते गेले नाही ?
🔺नाईल , अॅमेझोन सारख्या मोठ्या नद्या शंकराच्या जटेतनं का निघाल्या
नाहीत?
🔺त्यांना हिमालय सोडून अंटार्टीका जे हिमालयापेक्शा कीतीही पटीने बर्फाच्छिद आहे तिथं रहायला का गेले नाही ?
🔺३३ कोटी देव असुनही आपण एवढे वर्षे गुलाम , अज्ञानी , मागास कुपोषित कसे ?
अवश्य विचार करा !
सत्याची चिकित्सा करा !
इतिहास वाचा, समजा, समजावून सांगा !
▶आणि सत्य आहे तेच कबूल करा◀
जय भारत…
अंधश्रद्धा निर्मुलन